आम्हाला जाणून घ्या

आमच्याविषयी थोडेसे

मराठी मध्ये निर्धार म्हणजे संकल्प किंवा निश्चय, प्रतिष्ठान म्हणजे एक संस्था.

निर्धार प्रतिष्ठान ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कै. श्री. श्रीपाद शिंदे यांची होती, त्यांनी समविचारी आप्तेष्टांना आणि मित्र परिवाराला सोबत घेऊन १९९० मध्ये ट्रस्टची स्थापना केली. त्यानंतर ट्रस्टने विरार रेल्वे स्थानकापासून (मुंबईच्या उपनगर) केवळ ९ किमी च्या अंतरावर टोकरे गावात जमीन संपादन केली. ११ डिसेंबर १९९९ पासून बौद्धिकदृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी निवासस्थान सुरू झाले. निर्धारचे कार्यकारी विश्वस्त श्री. सुरेश नाईक सुपुत्र अमोल हे या निर्धारचे पहिले रहिवासी झाले.

“निर्धार”ची उद्दिष्टे

निर्धार प्रतिष्ठानचे उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत:

आयसीपींना संधी

बौद्धिकसृष्ट्याअपंग व्यक्तींची क्षमता विकसित करणे आणि त्यांना त्यांचे जीवन स्वतंत्रपणे जगू देण्याची संधी त्यांना उपलब्ध देणे.

आयसीपींना आरामदायक आयुष्य

बौद्धिकसृष्ट्याअपंग व्यक्ती घरापासून दूर असले तरी त्यांना घरगुती उबदार वातावरण उपलब्ध करून देणे, त्यांना एका सन्माननीय, आनंदी आणि आरामदायी आयुष्याची जाणीव करून देणे .

पालकांना सहकार्य

बौद्धिकरित्या अपंग असलेल्या प्रौढांना आणि मुलांच्या पालकांना योग्य समर्थन, माहिती आणि सहाय्य प्रदान करणे.

जागरूकता आणि वकिली

बौद्धिक अपंग असलेल्या लोकांना जवळून आणि संवेदनशीलतेने जाणून घेणे हा सखोल मानवी अनुभव आहे.

या जगामध्ये असण्याचे वैविध्यपूर्ण मार्ग आहेत याची आम्हाला जाणीव करुन दिली. प्रेम आणि आनंदाची त्यांची क्षमता आपल्याला मनापासून स्पर्श करते. ते आम्हाला बिनशर्त प्रेम, सध्याचे जीवन जगणे, विश्वास आणि निर्दोषपणा आणि अहंकारापासून मुक्ती शिकवतात. जर आपण आपल्यात हे गुण आत्मसात करू शकत असाल तर .... जीवन खरोखर सुंदर असेल.